प्राचीन ऋषीमुनी ब्रह्मांडात भ्रमण करू शकत होते, मग त्यांनी अमेरिका खंडाचा शोध का लावला नाही?
तुम्हाला गणितातील sinusoidal wave माहिती आहे का?
जगातली प्रत्येक संस्कृती अशीच वरखाली हेलकावे खात असते.
भारतीय संस्कृतीचा (हिंदू संस्कृती म्हणा हवं तर) एक सुवर्णकाळ होता. त्यावेळी काव्य-शास्त्र-विनोद, तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान, गणित, विज्ञान, खगोलशास्त्र, वैद्यक अशा बहुतेक सगळ्याच ज्ञानशाखांमध्ये प्रचंड प्रगती झाली होती.
त्या काळचे तज्ज्ञ लोक (ऋषी मुनी म्हणा, किंवा आणखी काही) ब्रह्मांडात भ्रमण जरी करू शकत नसले, तरी ब्रह्मांडाचा वेध मात्र नक्की घेऊ शकत होते.
उदाहरणार्थ, हजार-दीड हजार वर्षांपूर्वी भविष्यात घडणाऱ्या ग्रहण, युती अशा कित्येक खगोलशास्त्रीय घटनांचं भाकीत गणिताद्वारे करता येत होतं. त्या काळाच्या मानाने भारतीय हिंदू संस्कृती खूपच पुढारलेली होती.
पण हळूहळू त्या उत्क्रांत संस्कृतीचं अधःपतन सुरू झालं. ज्ञानार्जनाऐवजी कर्मकांडाचं महत्त्व वाढलं. त्यामुळे आपण स्वतःवर अनेक बंधनं लादून घेतली.
सिंधुबंदी हे असंच एक बंधन. त्यानुसार समुद्र ओलांडणं हे महापातक! नंतरच्या काळात (Discovery Period) जेंव्हा युरोपीय दर्यावर्दी जगाचा वेध घेत होते, तेंव्हा आपण स्वतःला कोंडून घेतलं होतं. त्यांनीअमेरिका शोधली, आपण भारतीय उपखंड सोडायला तयार नव्हतो!
आधी कर्मकांडाचा अतिरेक, मग परकीय आक्रमणं यामुळे भारतीय हिंदू संस्कृती खचत गेली.
पण असे उतार चढाव प्रत्येक संस्कृतीत होत असतात…
मधला एक काळ इस्लामचं सुवर्णयुग होतं. बगदाद हे ज्ञानाचं केंद्र होतं. विशेषतः, भारतीय, चिनी, ग्रीक पंडितांना तिथे राजाश्रय होता आणि तिथे जगातल्या विविध कल्पनांची देवाणघेवाण चाले.
एकेकाळी ज्ञानाचं केंद्र असलेली इस्लामी संस्कृती पुढे कर्मकांडात बुडाली, आणि अजूनही तिथेच अडकून आहे!
इस्लामचं सुवर्णयुग सुरू असताना युरोपचं अंधपर्व (Dark Ages) सुरू होतं. पूर्वीची प्रगत रोमन संस्कृती लयाला गेली होती आणि युरोप पूर्णतः "अडाणी" झाला होता.
पण लवकरच तिथे प्रबोधनकाळ (Renaissance) सुरू झाला, आणि युरोपची वाटचाल "प्रगत संस्कृतीच्या" दिशेने सुरू झाली, ते आजतागायत!
अशा कितीतरी संस्कृती बहरल्या आणि लयाला गेल्या. सिंधू संस्कृती, इजिप्शियन संस्कृती, मेसोपोटेमियन संस्कृती यांची तर फक्त नावंच शिल्लक राहिली!
जगात दोनच महत्त्वाच्या संस्कृती "खाली-वर होतं" टिकून राहिल्या —चिनी संस्कृती आणि भारतीय संस्कृती!
थोडक्यात, आपल्या जेंव्हा ऋषीमुनींनी ब्रह्मांडाचा वेध घेतला तेंव्हा आपलं सुवर्णयुग सुरू होतं, आणि युरोपीय लोकांनी अमेरिका शोधली तेंव्हा त्याचं!
चालायचंच! पण सुरुवातीच्या चित्रात दाखवलेल्या sine wave ने तळ गाठून आता "वरच्या दिशेने" वाटचाल सुरू केली आहे, हे विसरू नका!
वैदिक भूगोल समजुन घेताना भारतीय ज्योतिष वाड्मयाचा व पुराणांचा अभ्यास आवश्यक आहे. अन्यथा निष्कर्ष विचित्र बनतात . जम्बु द्वीपाचा म्हणजे प्रस्तुत पृथ्वीच्या प्राचीन भूगोलाचा फक्त आपण विचार येथे करणार आहोत. पुराणे व ज्योतिष ग्रंथांनुसार एकंदर सप्त द्वीपे आहेत, जम्बु ,प्लक्ष, शाल्मल, कुश ,क्रौञ्च, शाक, पुष्कर . त्यातील केवळ जम्बु द्वीप मानवी दृष्टीगम्य आहे. इतर दुसर्या डायमेंशन मध्ये आहेत. अनेक संशोधकांची इथेच चूक झाली व ते इतर ६ द्वीपे ह्या पृथ्वीवरच शोधत बसले. पुराणात स्पष्ट उल्लेख आहे, की जम्बु द्वीप लवणसागराने वेढलेले आहे. इतर द्वीपांभोवती असलेले सागर वेगळ्या द्रव्याचे आहेत. तेव्हा दृश्य पृथ्वी म्हणजे केवळ जम्बु द्वीप होय. जम्बुनद् हा एका जांभळट रंगाचा सुवर्णाचा प्रकार आहे. हे सगळ्यात उच्च दर्जाचे सुवर्ण आहे , जे ह्या पृथ्वी वरच उपलब्ध होते.(अजुन ही असेल) . तर जम्बु द्वीपाची विभागणी नऊ वर्षात म्हणजे देशात केली आहे. संस्कृतमध्ये देशाला वर्ष असे म्हणतात जसे भारतवर्ष ! .
त्यांची स्थाने मेरु पर्वताला केन्द्र ठेऊन सांगितली आहेत. मेरु पर्वत म्हणजे पृथ्वीच्या केन्द्रातुन जाणारा दक्षिण-उत्तर अक्ष होय.ह्या नऊ वर्षांची माहिती खाली देत आहे.
१. भारतवर्ष- हिमालय ते कन्याकुमारी
२.किम्पुरुषवर्ष- इंडोनेशिया,मलेशिया,कम्बोडिया आदि आग्नेय भाग, इथे रामोपासना चालायची. अजुन ही चालते
३.हरिवर्ष- इथे नृसिंह उपासना चालायची
४.रम्यक- इथे मत्स्य अवताराची उपासना चालायची
५.हिरण्यमय-इथे कूर्मरुपात उपासना चालायची
६.उत्तरकुरु- हे म्हणजे सध्याची दक्षिण अमेरिका . ह्याचा आकार भारतासारखा धनुष्याकार वर्णिलेला आहे. इथे वराहरुपात उपासना चालायची
७.भद्राश्ववर्ष- हे म्हणजे चीनचा अतिपूर्वेकडचा भाग. कदाचित आता तिथे पॅसेफिक सागर आहे. इथे घोड्याचे डोके असलेल्या विष्णुमूर्तिची (हयग्रीव)उपासना व्हायची.
८.केतुमाल वर्ष- इथे कामदेवरुपात उपासना व्हायची , हे म्हणजे आफ्रिका खंड किंवा युरोप
९.इलावृत्त वर्ष- हे उत्तर ध्रुवाभोवती आहे. इथेच गन्धमादन पर्वत आहे. इथुन चार पवित्र नद्या चार दिशेला गेल्या. त्यातील एक म्हणजे गंगा, अन्य नद्या चक्षू(फरात- इराक मधील) , सीता(रशिया/चीन) ,भद्रा (उ. अमेरिका). अरबांच्या इतिहासानुसार, ह्या पवित्र नद्या नील्,फरात्,जेहु,सेहु अशा आहेत. जिज्ञासुना अधिक शोधता येईल.
लाखो वर्षात समुद्र व इतर भूरचनेत वारंवार बदल झाल्यामुळे, वरील शहरे अचूक हुडकून काढणे अशक्यप्राय बनले आहे. तरी ही वरील माहिती कमी इंटरेस्टिंग नाही. ज्यांना प्राचीन इतिहासात रस आहे त्यांना मजेशीरवाटेल अशी आशा आहे.
स्त्रोत :: प्राचीन वैदिक भूगोल व शहरे
त्याकाळच्या ऋषीमुनी किंवा राजे किंवा व्यापारी कोणीतरी अमेरिकेत गेले असतील पण नाव अमेरिका असेल का? समजा, जर 'झन्ज्जकफ्फ' असं काही नाव प्राचीन लेखात आलं आणि त्यात तो देश कुठे आहे हे लिहिलेलं नसेल तर कळणारसुद्धा नाही की 'झन्ज्जकफ्फ' म्हणजे अमेरिका. अमेरिका नावच मुळात आधुनिक आहे (कोलंबस मुळे पडलेलं).
- पुराणानुसार भारत हा एकच देश नव्हता आणि भारत हे नावसुद्धा अर्वाचीन आहे. पुराणात म्हणल्याप्रमाणे ७ खंड होते (सप्त द्वीप वसुमती) (कृपया संदर्भ पहा):
- जंबुद्वीप
- पलक्षद्वीप
- शाल्मलिद्वीप
- कुशद्वीप
- क्रौंचद्वीप
- शाकद्वीप
- पुष्करद्वीप (अग्नी पुराण आणि मत्स्य पुराण).
चित्रस्त्रोत: hitxp.com/articles/history/ancient-india-geography-jambudvipa-bharathavarsha-bharatha-khanda/
- आज आपल्याकडे ७ खंड आहेत: आशिया, आफ्रिका, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, अंटार्टिका, युरोप, ऑस्ट्रेलिया. भारताला (म्हणजे भारतीय उपखंडाला) जंबुद्वीप किंवा सुदर्शनव्दिप म्हणायचे (विष्णू पुराण आणि मार्कंडेय पुराण). त्याकाळच्या लोकांना तर भारत नावसुद्धा अनोळखी असेल.
चित्रस्त्रोत: Jambudwipa: The Seeds Of Political Unity In The Indian Subcontinent
- त्याचप्रमाणे अमेरिकेला, इंग्लंडला, चीनला इतरही नावे असतील, त्यांच्यासोबत सुद्धा शैक्षणिक, व्यापारी, सामरिक संबंध असतील. कदाचित अजून तो इतिहास आपल्या समोर यायचा असेल. कारण हडप्पा संस्कृतीमध्येच एकाखाली एक कितीतरी शहरे सापडली आहेत आणि अजून कोणाला त्यांची लिपी अधिकृतपणे वाचता आलेली नाहीये. म्हणजे अजून आपण इतिहासात खोलवर डोकावलेलं नाहीये, असं मला वाटत.
मी जर-तर ने लिहितोय कारण मी इतिहास संशोधक नाही, मी फक्त काही ठिकाणी जे वाचलेय ते संदर्भासहित लिहितोय इथे. मी हेसुद्धा मान्य करतो की पुराणात काही गोष्टी अतिरंजित करून लिहिलेल्या असू शकतात. अगदी पानिपतचे वर्णन करतानासुद्धा राम गणेश गडकरी कौरव-पांडवांची उपमा देतात आणि राजराजवाडांची वर्णने करताना चंद्र-सूर्याची उपमा देतात. तसेच इतिहास वर्णन करताना पुराणात झाले नसेल कशावरून?पण अतिरंजित करण्यासाठी कुठल्याही गोष्टीचा पाया हा सत्यावर आधारित असू शकतो, हि शक्यता नाकारून चालणार नाही. मी कोणतीही शक्यता नाकारत नाहीये, फक्त डोळे उघडे ठेवून बसलोय.
संपादन १:
- ७ द्वीप म्हणजे ७ खंड नव्हेत, मला इथे फक्त सार्धम्य (analogy) दाखवायचं आहे.
- माझ्या या उत्तरात जे-जे काही मी लिहिलंय त्याचे संदर्भ दिले आहेत. तरीही, मी अंशतः किंवा पूर्णपणे चूक असू शकतो आणि तसं असण्याला माझी तयारी आहे.
संदर्भ:
सर्व पुराण तुम्हाला इथे वाचता येतील: Ved - Puran
Jambudweep - The Global Island
कळावे, लोभ असावा.
जर आम्ही पुराणात लिहिलेल्या प्रमाणे आम्ही पृथ्वी चा अभ्यास करत बसलो तर आम्हाला खुप खुप नवीन माहिती मिळत जाईल जसे पृथ्वी गोल नसून चौकोन आहे पृथ्वी ही अन्तरिक्षात नसून शेष नागा च्या फनणयां वरअभी आहे आपली पृथ्वी ब्रह्मांड च्या मध्य भागी आहे सूर्या सहित इतर सर्व ग्रह तारे पृथ्वीला प्रदक्षिणा घालतात पृथ्वी ही चल नसून स्थिर आहे इत्यादि इत्यादि, आणि पृथवी ची ही भौगोलिक माहिती लिहिली आहे तीन्ही लोकांचे ज्ञान असन्याचे ब्रह्मा चे वरदान मिळालेल्या विश्वामित्र ऋषि ने
पौराणिक कथांबद्दल मला फारच जुजबी ज्ञान आहे. त्यामुळे खरोखर अस कोणत्या कथेत लिहील आहे याबद्दल काही माहिती नाही. जर लिहील असेल तर तो केवळ एक कल्पनाविलास आहे.
लहानपणी गोष्टींच्या स्वरुपात कथांमध्ये महाकाय राक्षसांचा उल्लेख ऐकलेला. पण या राक्षसांचे अवशेष आजतागायत कधी सापडले नाहीत. याउलट पौराणिक कथांमध्ये उल्लेख नसलेल्या भीमसरटांचे (Dinosaur) अवशेष मात्र सापडले आहेत. त्यामुळे पौराणिक कथा या एखाद्या पुरातन लेखकाचा ललितकथासंग्रह होता, अस मानायला काही हरकत नाही. किंवा खऱ्या व्यक्तींबद्दल उगाचच बढवून चढवून लिहीलेल्या काल्पनिक गोष्टी असाव्यात. हे विधान सर्व धर्मातील पौराणिक कथांना लागू होत.
बाकिच्या धर्मातही ईश्वराने सृष्टीची निर्मिती केली अस म्हटल आहे. पण धर्मग्रंथामध्ये सृष्टीच वर्णन करताना अमेरिकेचा उल्लेख नाही आहे.
कारण ज्या वेळी हे ग्रंथ लिहीले गेले त्यावेळी संबंधित लेखकांना अमेरिकेच्या अस्तित्वाची माहीती नव्हती.
१. कारण कि त्याकाळी कोलंबस जन्मास आला नव्हता.
२. अमेरिकेचा शोध कोलंबसने इ.स. १४९२ मध्ये अमेरिकाच शोध लावला त्यामुळे ऋषी मुनी अमेरिकेत जाऊ शकले नाहीत.
३. ऋषी मुनी हवेत असेच स्पायडर मॅन किंवा सुपरमॅन सारखे हवेत अलगद उडून जात होतेत आणि ब्रह्माण्डातून सूक्ष्म वस्तू दिसत नाहीत.
४. भारतीय दृष्टी कधीच चिकित्सकाची राहिलेली नाही त्यामुळे आपल्या पदरात एकसुद्धा शोध नाही.
५. भारतीयांनी कोट्यवधी देवी देवतांचा शोध लावला मग अशा अमेरिकेसारख्या शोधला कोण विचारतो ?
वैदिक काळी संपूर्ण पृथ्वीचे खंड ज्ञात होते. आजचा मेक्सिको म्हणजे त्या काळातील पाताळ लोक होता. वामनावतारांत बळी राजाला तेथे ठेवले होते. असे अनेक दाखले वैदिक वाङ्मयांत आहेत.
Comments
Post a Comment