गावांच्या वेशी बाहेर मारुती मंदीर का असते? व नमस्कार घालताना रामराम हा उच्चार केव्हापासुन प्रचलित झाला?
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला अन त्याच शकांत १५९६ जेष्ठ वद्य नवमी माँ साहेब जिजाऊ यांना देवाज्ञा झाली . त्याची उत्तरक्रीया महाराजांनी केली या वेळी ते शोकांतात होते . अश्विन शुध्द पंचमीचा मुहूर्त त्यांनी पुन्हा सिंहासनारोहण सभा केली परंतु राजदरबारात मन लागेना पावसाळा गेला यानंतर लगेच संभाजी राजे व कारभारी यांचे सोबत संपत्ती व सरदार अष्टप्रधान फ़ौज घेवून ते राजगडावर आले . प्रतापगडच्या देवीचे दर्शन घेवून रामदास स्वामी यांना भेटायला गेले. त्या वेळी महाराजांना भेटण्यास अनेक लोक येत होते. व ज़ोहार करत होते. त्यावेळी समर्थ रामदास स्वामींनी प्रश्न केला जोहार म्हणजे काय ?या वर महाराज म्हणाले जोहार म्हणजे वंदन करणे . रामदास स्वामी बोलले जोहार या शब्दाचा अर्थ समजत नाही या जागेवर राम राम बोलावे. हा उपदेश सोबत असलेल्या सर्व सेवेकरी सैन्य व जमावाने मान्य केला . त्या नंतर महाराजांनी स्वामींना परळी कील्ला (सातारा) येथे येण्यास विनंती केली व चाफळच्या श्रीराम उत्सवासाठी अकरा गावे मोकासे (कर वसुली) व सरदेशमुखी नेमुन ११००० होन देवून बंदोबस्त केला व स्वामीनी तेथे स्वीमिंग रहावे अशी विनंती केली तेथे राजमंदीर दरवाज़ा व हवालदार सर्व आपल्या आज्ञेत असेल आपण केव्हाही येवून राहू शकता असे सुचविले याउपर स्वामींनी सांगीतले आपले राज्य जेथे तेथे हनुमान मंदिर बांधावे आम्ही जेथे मंदिर तेथे राहू हा उपदेश महाराजांनी स्वीकारला व अनेक गावी महाराज स्वत्: उपस्थित राहून मंदिरे करीवली काही स्वामींनी तर काही सरदारांनी मंदिरे उभारली . या मुळे प्रत्येक गावात ग्राम दैवत हनुमान मंदिर बनले जेथे मंदिर तेथे महाराजांचा अंबल होता. धर्म स्थापनेतील ही गोष्ट अभ्यासक व सर्वांनाच खुप महत्वाची ठरते.
शिवराय असे शक्ती दाता…🚩
हनुमाजींची मंदिरे, भक्ति आणि तालीम ह्या तीन गोष्टींचा प्रचार व प्रसार हा समर्थ रामदास ह्यांनी महाराष्ट्र भर स्वराज्यची मोहिमे बरोबर केला. समर्थांचा प्रसार मंत्र होता ‘ श्रीराम जयराम जयजय राम’. ह्यां मंत्राच्या प्रचारात अपभ्रंश होता होता ग्रामीण भागांत रामराम एवढाच मंत्र राहीला, असे मी प्रवचनात ऐकले आहे.
अशी मान्यता आहे कि हनुमानजींना रामराम ऐकणे आवडते. त्यामुळे हनुमान मंदिरात प्रवेश केल्यावर प्रथम रामनाम घ्या नंतर हनुमानाचे स्मरण करा. बाहेर निघतांना परत रामनाम ह्या. तरच हनुमान भक्ति पुर्ण होउन, हनुमान प्रसन्न होतात.
गावात कुठलीही वाईट किंवा अनिष्ट शक्तिचा प्रवेश होउ नये ह्या करीता वेसेवर हनुमानजींचे मंदिर असते.
Comments
Post a Comment